Sunday, February 20, 2011

अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे

         नाही नाही म्हणता म्हणता मला पण या विषयावर लिहायचा मोह मला आवरला नाही. ज्याने सर्वाना जोडून ठेवला आहे अश्या एक "क्रिकेट" नावाच्या महायुद्धला सुरुवात झाली आहे. ओपनिंग सरेमोनी त ब्रायन महाशयांनी तर गाने म्हणून रंगतच आणली, आणि सोबतीला सोनू निगम आणि शंकर महादेवन ही होते...तर एकुणच दिमाखदार अशीच सोहळ्याची सुरुवात होती.    

       आणि आता ज्याची आपण सर्व आतुरतेने वात बघत होतो तो दिवस आला... भारत (ज्याला तुम्ही इंडिया म्हणून संबोधता, क्रिकेट खेळताना)  आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली मैच. वातावरण तर आधीच क्रिकेटमय अणि त्यात शनिवार पहिली मैच..आता पुढे काय राव...२:३० वाजले बंगलादेश ने टॉस जिंकुन भारताला फलंदाजी (ब्याटिंग) ला बोलावल...आणि क्रिकेट विश्वातील सर्वात बेस्ट ओपनिंग जोड़ी (आफ्टर ऑल मी भारतीय आहे)  सचिन अणि सेहवाग आलेत..पहिला बॉल अणि...४ , बस तिथेच ठरला की मैच आपण जिंकणार. सचिन च्या ब्याटिंगला आपण मुकलो खरे अणि बहुतेक तेच सेहवाग ला खटकल अणि म्हणून काय त्याने एकट्यानेच त्याचे अणि सचिनचे दोघांचे रन्स काढलेत तेहि पूर्ण १७५. सोबतीला कळस म्हणून कोहली होताच अणि त्याने त्याच 'विराट' स्वरूपात नॉट आउट १०० रन्स केलेत. अणि पुढे काय तुम्हा सर्वाना तर माहितच आहे, भारताने त्याच दिमाखात पहिली मैच जिंकली.
          चला सुरुवात तर चांगली झाली आहे...वातावरण ही क्रिकेटमय आहेच.. म्हणजे अवघी पंढरीच ही क्रिकेट च्या रंगात न्हाउन निघाली आहे...अपेक्षा करुया की हेच वातावरण असेच राहिल आणि आपल्याला भारताच्या अश्याच म्याचेस (जिंकनार्‍या) आपल्या बघायला मिळोत....अणि परत एकदा हा विश्व कप आपल्यालाच मिळावा हीच अपेक्षा...
                 तर सर्व मिळून म्हणा   "अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे" 


Monday, January 31, 2011

देवी तुझ्या दारी आलो..

कालचीच गोष्ट...
घरी बसल्या बसल्या बोअर व्हायला लागल म्हणून मी, जीजाजी अणि ताई, असे आम्ही तिघे निघालो भटकायला..
एअक्चुली, ताई अणि जिजाजींना पुण्यात थोडा काम होता...आणि मी बोअर होत असल्यामुळे, मी सुद्धा बरोबर निघालो..
तर जिजाजींचे ओळखीचे एक जन नाशिक फाटा क्रॉस झाल्यावर "सॅन्डविक" कंपनीच्या अगदी पुढे रहायचे, जिजाजीना काम असल्यामुळे ताई अणि मी काय करायचे म्हणून समोरच असलेल्या श्री आई माता मंदिर येथे गेलो.

ते म्हणतात ना देवीच बोलावन आल्याशिवाय तुम्ही तिच्या दाराताही पाउल ठेऊ शकत नाही, असच काही...कारण ध्यानी मनी नसताना आम्ही तेथे पोहचलो.

काय सुंदर ते मंदिर. पांढर्या शुभ्र संगमरवरी दगडात मंदिर कोरल आहे. स्वछ अणि निर्मल असाच ते.
राजस्थानी कलेच ते मंदिर. (अस मला वाटतय, ते कस काय हे नंतर...)
आत गेलो अणि देवीची ती लोभस्वानी ती मूर्ति पाहून मन प्रस्सन झाले. अणि नशीब तर एवढा थोर की आम्ही पोहोचलो अणि आरतीला सुरुवात झाली.
लयबद्ध, ताल अणि सुरात झालेली त्या आरतीने, कानाचे अणि डोळ्यांचे पारणे फेडले. तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ति करतोय, पण नाही, अचानक भेटलेला आनंद, 'जेष्ठ' महिन्याच्या च्या गर्मिनंतर आलेल्या पहिल्या पावसाने जेवढ बर वाटत, तसाच काहीसा तो अनुभव होता. (कारण आपण देवाचे दर्शन तसेही फार कमी घेतो  :)  ) अणि हो प्रसाद ही छान आहे.

श्री आई माता मंदिर, हे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर, "सॅन्डविक" कंपनीच्या अगदी समोर आहे.
 

Sunday, January 30, 2011

स्वप्न काय असतात ?

स्वप्न काय असतात ?
ती आपल्याला का पडतात ?
त्यांचा अर्थ तरी काय असतो?

मला नेहमी वाटायचा स्वप्न म्हणजे आपले विचार (अर्थातच चांगले, वाईट, गोड, अणि बरेच.. ) जे आपल्या डोक्यात असतात.
मला आठवतय लहान असताना प्यांट वर लाल चड्डी घलुन उडत सुपरम्यान झालो होतो स्वप्नात  :) अणि जसा जसा मोठा होत गेलो तर आधी बिल गेट्स नंतर मार्क झुकरबर्ग (फेसबुक  वाला) झाल्याची स्वप्ने पडायला लागली.


काल रात्रीला सुद्धा असेच एक स्वप्न पडल, खर तर ते माज्या पूर्वीच्या एक निर्णयाशी रिलेटेड होत...त्यावरून माला वाटला की मी जो निर्णय घेतला होता, तो चुकीचा होता, कारण काय माला नक्की आठवत नाही, पण कदाचीत काहीतरी, कुठेतरी मिस कम्मुनिकेशन झालं होता... 


असो ...
तर सांगायचा मुद्दा हा की, स्वने ही खरच आपल्याला काही सूचित करत असतात काय? कारण कधी कधी मी स्वताला स्वप्नात, प्यांट न घालता फ़क्त इन्नर वेअर मधे ऑफिस ला बसल्याचे बघितले आहे...
 :)   :)